3. समाज
”””””””””””””””””””””””””””””””””””””
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न (1) समाज कशाला म्हणतात ?
उत्तर__ एका निश्चित प्रदेशांमध्ये रहात असलेल्या लोकांच्या समूहाला समाज म्हणतात
प्रश्न (2) समाजाचे प्रकार कोणते ?
उत्तर__ 1. ग्रामीण समाज
2. शहरी समाज
3. आदिवासी समाज हे समाजाचे तीन प्रकार होत.
प्रश्न ( 3) समाजाची वैशिष्ट्ये सांगा ?
उत्तर 1) लोक एकत्र राहतात
2 ) लोक सहकार्याने राहतात
3 ) समाजात एकमेकाला मदत करतात
4)एकमेकांच्या कार्यात मदत करतात
प्रश्न (4) ग्रामीण समाजात कोणते व्यवसाय करतात ?
उत्तर __ ग्रामीण समाजात सुतार ,लोहार,चांभार,कुंभार,सोनार,विणकाम , बुट्ट्या तयार करणार इत्यादी प्रकारचे व्यवसाय करतात
प्रश्न ( 5) ग्रामीण भागातील समस्या कोणत्या ?
उत्तर आरोग्य, स्वच्छता समस्या ,शिक्षण समस्या ,उद्योग समस्या,व्यवसाय , पाणी समस्या आरोग्य समस्याइत्यादी प्रकारच्या समस्या आढळतात
प्रश्न (6) ग्राम विकासासाठी सरकारने कोणत्या योजना आखल्या आहेत ?
उत्तर 1) जवाहर ग्राम समृद्धी योजना
2) सर्व शिक्षण अभियान
3) निर्मल ग्राम योजना
4) भाग्यलक्ष्मी योजना
5)आश्रय योजना इत्यादी योजना आखल्या आहेत
प्रश्न (7) शहरात गेल्यावर तू काय पाहशील ?
उत्तर__मी कारखाने उद्योगधंदे ,मोठमोठी दुकाने ,कॉलेज ,हॉटेल ,इमारती ,वेगळ्या प्रकारची वाहने, लोक दवाखाने , बाग , स्मारके, पुतळे इत्यादी पाहीन
प्रश्न (8) शहरांमधील समस्या कोणत्या
उत्तर _ वाहतूक,प्रदूषण,टाकाऊकचरा ,झोपडपट्ट्या,जलप्रदूषण ,भिकारी ,गटारी ,शिक्षण इत्यादी समस्या पहावयास मिळतात
प्रश्न (9) आदिवासी समाज कशाला म्हणतात ?
उत्तर_ दाट अरण्य जंगल अथवा डोंगराळ प्रदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबाच्या समूहाला आदिवासी समाज म्हणतात