7th SS 4.18व्या शतकातील भारत सा.श. 1707 – 1757 INDIA IN THE 18TH CENTURY (1707 – 1757C.E)

माध्यम – मराठी

विषय – समाज विज्ञान (2024)

इयत्ता – सातवी

1. कोणत्या शतकाला इतिहासकारांनी ‘मराठा सार्वभौमत्व’ काळ म्हटले आहे?
उत्तर – इतिहासकारांनी 18 व्या शतकाला ‘मराठा सार्वभौमत्व’ म्हटले आहे.

2 . पानिपतची तिसरी लढाई कोणाकोणामध्ये झाली?
उत्तर –पानिपतची तिसरी लढाई मराठे आणि अहमद शाह अब्दाली (अफगाण आक्रमक) यांच्यात झाली.

3. कर्नाटक युद्धात शेवटी कोणाचा विजय झाला ?
उत्तर –कर्नाटक युद्धात शेवटी ब्रिटिशांचा विजय झाला.

4. प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली होती?
उत्तर –प्लासीची लढाई बंगालचा नवाब सिराज-उद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाली.

III. दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. पेशव्यातील पहिल्या बाजीरावांच्या योगदानाबद्दल लिहा.

उत्तर – पेशव्यातील पहिल्या बाजीरावांनी भारतात एक प्रचंड विशाल साम्राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता.त्यांनी हैदराबाद, माळवा, गुजरात आणि बुंदेलखंड ताब्यात जिंकून घेतले.बाजीरावांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे आपल्या सैन्यासह उत्तर भारताकडे कूच केले आणि दिल्लीवर आक्रमण केले.त्यामुळे त्याला ‘दुसरा शिवाजी’ ही पदवी मिळाली

2. प्लासीच्या लढाईची कारणे कोणती ?
उत्तर – ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचे नवाब सिराज-उद्दौला यांच्यातील वाद हे प्लासीच्या लढाईचे प्रमुख कारण होते.इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता पोर्ट विल्यम येथील किल्ला मजबूत केला आणि व्यवसायावरील कर सवलतींचा गैरवापर केला, ज्यामुळे तणाव आणि संघर्ष वाढला व हेच पुढे प्लासीच्या लढाईचे कारण ठरले.

Share with your best friend :)