7TH SS 24.भारत आणि शेजारील देश 24. India and neighboring countries

7वी समाज विज्ञान 

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

विषय – स्वाध्याय 

I. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा :

  1. कारगिल युद्ध १९९९ साली झाले.
  2. तिबेटीयन धर्म गुरू दलाई लामा हे होत.
  3. शेख मुजाबीर रहमान यांच्या नेतृत्वाखाली अवामी लिंग मुक्ती चळवळ सुरू झाली.
  4. SAARC ची स्थापना १९८५ साली झाली.
  5. चितगाँव पर्वतमय प्रदेशातून भारतात आलेले स्थलांतरीत म्हणजे चकमा होय.

II. दोन तीन वाक्यात उत्तरे द्या :

  1. भारताच्या शेजारील देश कोणते?

उत्तर – पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका.

2. भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यातील अडथळ्यांची यादी करा.

उत्तर – काश्मीर प्रश्न, दहशतवाद, सीमेवरील तणाव, ऐतिहासिक वाद.

3. भारत चीन संघर्षांची मुख्य कारणे कोणती ?

उत्तर – सीमावाद, अरुणाचल प्रदेश व लडाखवरील दावा, व्यापार तणाव.

4. बांगला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारताने बजावलेल्या भूमिकेचे विश्लेषण करा.

उत्तर – भारताने पाकिस्तानशी युद्ध केले, बांगलादेशला लष्करी मदत केली आणि निर्वासितांची काळजी घेतली.

5. 1962 च्या चीन भारत युद्धाचे परिणाम कोणते ते लिहा.

उत्तर – भारताला पराभव पत्करावा लागला;

भारत-चीन संबंध ताणले गेले;

भारताने संरक्षणावर भर दिला.

6. सार्क संघटनेच्या स्थापनेचे उद्देश कोणते ?

उत्तर – सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवणे.


Share with your best friend :)