नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो, आपल्या भारत देशात दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ (Republic Day) म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी खऱ्या अर्थाने ‘संविधान’ 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले.
प्रजासत्ताक दिन भाषण
हमारी पहचान तो बस इतनी है, कि हम सब हिंदुस्तानी हैं!”
आज आपण भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पण देशाला चालवण्यासाठी, प्रत्येकाला समान हक्क देण्यासाठी एका मजबूत कायद्याची गरज होती. ती गरज पूर्ण केली आपल्या संविधानाने. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीच्या अथक परिश्रमांमुळे 26 जानेवारी 1950 रोजी देशात ‘भारतीय संविधान’ लागू झाले आणि भारत एक ‘प्रजासत्ताक राष्ट्र’ बनले.
मित्रहो, प्रजासत्ताक म्हणजे काय?
प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य. आज आपल्याला जे शिक्षणाचे, बोलण्याचे आणि जगण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, ते याच संविधानाची देणगी आहे.
आजच्या दिवशी आपण त्या शूर वीरांना विसरून चालणार नाही, ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अशा अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांमुळेच आज आपण मोकळ्या श्वासाने जगत आहोत. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देणे, हीच आपली जबाबदारी आहे.
आज आपण संकल्प करूया की, आपण केवळ 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीलाच देशभक्ती दाखवणार नाही, तर एक जबाबदार नागरिक म्हणून कायम देशाच्या प्रगतीत हातभार लावू. स्वच्छ भारत, साक्षर भारत आणि समर्थ भारत घडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया.
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, उत्सव तीन रंगांचा!”




