LBA 9वी मराठी गद्य 8 -बाबाखान दरवेशी | पद्य 8 -आचंद्रसूर्य नांदो

पाठ (Lesson) / कविता (Poem)अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes)
गद्य 8 – बाबाखान दरवेशी1.व्यक्तिचित्र हा साहित्य प्रकार समजून घेणे.
2.व्यक्तिचित्र साहित्यातील पात्र, प्रसंग, घटना, यांचा समन्वय साधणे.
3.प्राणी आणि मनोरंजन करणाऱ्या लोकांविषयी माहिती मिळविणे.
4.प्राणीमात्रांवर दया करण्याचे सामर्थ्य विकसित करणे.
पद्य 8 – आचंद्रसूर्य नांदो1.देशभक्ती मुलांच्या मध्ये जागृत करणे.
2.देशभक्ती गीतातून स्वातंत्र्याविषयी देश प्रेम निर्माण करणे 3.भारताचा पौराणिक ऐतिहासिक राजकीय इतिहास 
4.कवितेतून सांगणे ग. दि माडगूळकरांचे साहित्य समजावून देणे.
9वी मराठी प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमूना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 9वी विषय – मराठी गुण – 20
गद्य 8 – बाबाखान दरवेशी पद्य 8 – आचंद्रसूर्य नांदो
प्रश्नपत्रिकेचा आराखडा (Blueprint)
उद्देश (Objective)प्रश्नाचे स्वरूप (Question Type)प्रश्नांची संख्या (No. of Q.)गुण (Marks)
स्मरणMCQ (वस्तुनिष्ठ)66
स्मरण/आकलनएका वाक्यात उत्तरे55
आकलनलघुत्तरी प्रश्न (2-3 वाक्ये)24
अभिव्यक्ती/आकलनदीर्घोत्तरी प्रश्न (4-5 वाक्ये)25
**एकूण****15****20**
विभाग १: गद्य (10 गुण)
प्र. 1. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
Q.1. बाबाखान हा कोण होता? [1] (अ) कलाकार (ब) भांडखोर (क) दरवेशी (ड) वेडा
Q.2. काळोख्या रात्री कोणाच्या घरापुढे माणसं गोळा झाली ? [1] (अ) उमाजीच्या (ब) कुळंबीणीच्या (क) लेखकाच्या (ड) बाबाखानच्या
Q.3. बाबाखानने हा प्राणी पाळला होता. [1] (अ) माकड (ब) अस्वल (क) कुत्रा (ड) वाघ
प्र. 2. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
Q.4. या पाठात दरवेशाचे नाव काय आहे ? [1]
Q.5. बाबाखानने अस्वल का पाळले होते ? [1]
प्र. 3. खालील प्रश्नाचे उत्तर दोन ते तीन वाक्यात लिहा. (2 गुण)
Q.6. बाबाखान दरवेश्याच्या स्वभावाचे वर्णन करा. [2]
प्र. 4. खालील प्रश्नाचे उत्तर चार ते पाच वाक्यात लिहा. (3 गुण)
Q.7. बाबाखानने अस्वलाचा सांभाळ कशा प्रकारे केला होता ? [3]
विभाग २: पद्य (10 गुण)
प्र. 5. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
Q.8. पार्थास बोध याने केला. [1] (अ) श्रीकृष्णाने (ब) शिवबाने (क) माधवाने (ड) गौतमाने
Q.9. येथे याचा पायाच सत्य आहे. [1] (अ) जन शासनाचा (ब) भांडवलशाहीचा (क) हुकूमशाहीचा (ड) सावकारशाहीचा
Q.10. ‘गीतरामायण’ कोणी लिहिले. [1] (अ) व्यंकटेश माडगूळकर (ब) ग. ल. ठोकळ (क) योगीराज वाघमारे (ड) ग. दि. माडगूळकर
प्र. 6. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
Q.11. ‘आधुनिक वाल्मिकी’ असे कोणाला म्हटले आहे ? [1]
Q.12. हा देश कशाचे स्तन्य प्याला आहे ? [1]
Q.13. या देशात कशाची रामायणे घडावीत असे कवीला वाटते ? [1]
प्र. 7. खालील ओळींचे स्पष्टीकरण दोन ते तीन वाक्यात लिहा. (2 गुण)
Q.14. ‘शिर उंच उंच व्हावे, हिम वंत पर्वताचे’ या ओळीतून कवीला काय सुचवायचे आहे? [2]
प्र. 8. खालील प्रश्नाचे उत्तर चार ते पाच वाक्यात लिहा. (3 गुण)
Q.15. हे क्षेत्र पुण्यदायी कशाने बनले आहे ? [3]
**– प्रश्नपत्रिका समाप्त –**
Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now