SSLC अर्धवार्षिक परीक्षा सप्टेंबर 2025
माध्यम – मराठी
MODEL ANSWER KEY
विषय – समाज विज्ञान
वेळ – 3 तास 15 मिनिटे
गुण – 80
SSLC अर्धवार्षिक परीक्षा सप्टेंबर 2025 च्या सरावासाठी दिलेल्या खालील समाज विज्ञान नमूना प्रश्नपत्रिकेची नमूना उत्तरपत्रिका आपली उत्तरे तपासण्यासाठी मदत करेल.
SSLC अर्धवार्षिक परीक्षा सप्टेंबर 2025
नमूना प्रश्नपत्रिका
विषय – समाज विज्ञान
नमूना उत्तरे
I. अपूर्ण वाक्ये / प्रश्नांसाठी प्रत्येकी चार पर्याय दिले आहेत. योग्य उत्तर निवडा व संपूर्ण उत्तर अक्षरासह लिहा. (8 × 1 = 8)
1. पहिल्या अँग्लो-मराठा युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला?
2. पहिल्या अँग्लो-मैसूर युद्धाच्या शेवटी झालेला तह कोणता?
3. सार्वजनिक प्रशासनाचे जनक कोण?
4. “खरं तर, संपूर्ण मानवजाती एकच आहे” असे कोणी म्हटले?
5. संघटित कामगारांचे उदाहरण कोणते?
6. भारताचा सर्वात मोठा भौगोलिक विभाग कोणता?
7. अकराव्या पंचवार्षिक योजनेत कोणाला प्राधान्य देण्यात आले?
8. कोणत्या बँक खात्यात व्याज दिले जात नाही व सेवांसाठी शुल्क आकारले जाते?
II. प्रत्येकी एका वाक्यात उत्तर द्या: (8 × 1 = 8)
9. निळ्या पाण्याचे धोरण म्हणजे काय?
समुद्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी स्थलाऐवजी नौदलशक्ती वाढविण्याच्या धोरणाला “निळे पाणी धोरण” म्हणतात.
10. सहाय्यक सैन्य पध्दती म्हणजे काय?
सहाय्यक तैनाती फौज म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी व भारतीय संस्थानांमधील एक लष्करी तह होता.
11. जातीयवाद म्हणजे काय?
धर्माच्या आधारावर समाजाचे विभाजन करणे आणि त्या आधारावर परस्पर देशात्ती जोपासना करणे याला जातीयवाद असे म्हणतात.
12. पूर्वग्रह म्हणजे काय?
एखाद्या व्यक्ती किंवा गटाविषयी पूर्वनिश्चित झालेली वृत्ती म्हणजे पूर्वग्रह.
13. भारताच्या हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते?
अक्षांश, रेखांश, समुद्रापासूनचे अंतर, वाऱ्यांची दिशा, पर्वतरांगा व समुद्रप्रवाह हे घटक भारताच्या हवामानावर परिणाम करतात.
14. मातीची धूप म्हणजे काय?
मातीच्या वरच्या थराचे नैसर्गिक शक्तींमुळे होणारे वहन म्हणजे मृदा धूप.
15. सर एम. विश्वेश्वरय्या यांना “भारतीय आर्थिक योजनेचे पितामह” असे का म्हणतात?
भारताच्या आर्थिक विकासासाठी नियोजनाची गरज आहे असे त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे त्यांना “भारतीय आर्थिक योजनेचे पितामह” म्हटले जाते.
16. बँकांची बँक कोणती?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांची बँक आहे.
III. प्रत्येकी दोन वाक्ये / चार मुद्दे लिहा: (8 × 2 = 16)
17. ब्रिटिश साम्राज्य विस्तारासाठी दत्तक वारस नामंजूर धोरणाने कशी मदत केली?
जर एखादा भारतीय राजा वारसाशिवाय मरण पावला, तर त्याचा दत्तक मुलगा गादीवर बसू शकत नसे. अशा राज्यांचा ब्रिटिश साम्राज्यात समावेश केला जात असे. सातार, जयपूर, संभलपूर, उदयपूर, झाशी, नागपूर ही राज्ये ब्रिटिशांच्या ताब्यात आली.
18. अमरसुळ्याच्या उठावाला “शेतकऱ्यांचे बंड” असे का म्हणतात?
अमरसुल्याचा उठाव हा शेतकरी बंड होता. अपराम्परा, कल्याणस्वामी व पुट्ट बसप्प यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले. पुट्ट बसप्प यांनी तंबाखू व मीठावरील कर रद्द होतील असे जाहीर केले. त्यामुळे शेतकरी व जमीनदारांनी समर्थन दिले. त्यांनी सरकारी कार्यालये काबीज केली, तुरुंग व खजिना लुटला, सुल्या अमलदाराचा वध केला. नंतर ब्रिटिशांनी त्यांना पकडून तुरुंगात टाकले.
19. “सार्वजनिक प्रशासन मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सेवा देते” – स्पष्टीकरण द्या.
सार्वजनिक प्रशासन नागरिकांचे जीवन व मालमत्ता संरक्षित करून शांतता राखते. ते मूलभूत सुविधा, शिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते, राज्याचे रक्षण करते व आर्थिक समता सुनिश्चित करते. अशा असंख्य सेवा ते पुरवते.
20. अस्पृश्यता निर्मूलनासाठी घटनात्मक व कायदेशीर उपाय कोणते?
कलम 17 नुसार अस्पृश्यतेवर बंदी आहे. अस्पृश्यता गुन्हे कायदा, 1955. नागरी हक्क संरक्षण कायदा, 1976. सर्वांसाठी सार्वत्रिक मतदानाचा अधिकार. शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण. 1989 च्या कायद्यानुसार अस्पृश्यतेचे उच्चाटन राज्यांची जबाबदारी
किंवा
बेरोजगारीची कारणे कोणती?
(बेरोजगारीची कारणे): लोकसंख्या वाढ, यांत्रिकीकरण, कामाचे अति विभाजन, सामाजिक असमानता, भांडवलाची कमतरता, निरक्षरता.
21. देशाच्या आर्थिक विकासात द्वीपकल्पीय पठाराची भूमिका स्पष्ट करा.
येथे अफाट खनिजसंपत्ती आहे. येथे नद्या धबधब्यांनी समृद्ध आहेत व जलविद्युत निर्मितीसाठी उपयुक्त आहेत.
22. “भारतीय शेती ही मान्सूनचा जुगार आहे” – स्पष्ट करा.
भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेती पूर्णपणे मान्सून वाऱ्यांवर अवलंबून आहे. पाऊस न आल्यास दुष्काळ पडतो, तर अति पावसामुळे जनहानी व मालमत्तेचे नुकसान होते. त्यामुळे भारतीय शेतीला “पावसावरचा जुगार” म्हणतात.
23. नीती आयोगाची उद्दिष्टे कोणती?
(1) राज्यांच्या सक्रिय सहभागासह राष्ट्रीय विकास प्राधान्यक्रम, क्षेत्रे व धोरणांची सामायिक दृष्टी निर्माण करणे. (2) संरचित पाठबळ व यंत्रणेद्वारे केंद्र-राज्य सहकार्य वाढवणे, कारण सक्षम राज्ये म्हणजे सक्षम राष्ट्र.
24. बँक खाते उघडण्याच्या पायऱ्या कोणत्या?
कोणते खाते उघडायचे ते ठरवणे. बँक अधिकाऱ्याशी संपर्क करणे. अर्ज भरून देणे. शिफारस देणे. फॉर्म सादर करणे. अधिकाऱ्यांची मान्यता घेणे. प्रारंभिक ठेव करणे.
IV. प्रत्येकी सहा वाक्यांमध्ये उत्तर द्या: (9 × 3 = 27)
25. प्लासीच्या युद्धाची कारणे व परिणाम लिहा.
प्लासीची लढाई (1757): प्लासीची लढाई सिराज-उद-दौला व ब्रिटिश यांच्यात झाली. कारणे: 1. “दस्तक” परवान्याचा दुरुपयोग – यामुळे खजिन्याचे नुकसान झाले. 2. किल्ला परवानगीशिवाय दुरुस्त – कलकत्ता किल्ल्याची दुरुस्ती व तोफा बसविणे. 3. “ब्लॅक होल” घटना – 146 इंग्रजांना कैद करून त्यात 123 जणांचा मृत्यू झाला. परिणाम: 1. भारतीयांतील बेईमानी व ऐक्याचा अभाव उघड झाला. 2. मीर जाफर बंगालचा नवाब झाला. 3. कंपनीला बंगालवरील एकाधिकार हक्क मिळाले. 4. मीर जाफरला 17 कोटी 70 लाख रुपये द्यावे लागले. 5. शेवटी तो ब्रिटिशांचा बळी ठरला व खजिना रिकामा झाला.
26. भारतातील ब्रिटिश शिक्षणाचे परिणाम कोणते?
भारतीयांनी आधुनिकता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही विचार अंगीकारले. तर्कशुद्धता व राष्ट्रवाद वाढला. स्थानिक साहित्याला प्रोत्साहन मिळाले. शिक्षित वर्गात एकात्मता वाढली. नियतकालिके सुरू झाली. सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी उदयास आल्या. नव्या विचारवंतांनी तरुणांमध्ये जागृती केली. स्वातंत्र्यसंग्रामाला चालना मिळाली.
27. स्वामी विवेकानंदांचे योगदान स्पष्ट करा.
स्वामी विवेकानंदांनी शोषण, गरिबी, निरक्षरता व विभागणी पाहिली. ते म्हणाले लोकांना प्रथम शिक्षण द्या. सुधारणेसाठी कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशी त्यांची इच्छा होती. ते आंधळेपणाने पाश्चिमात्यांचे अनुकरण करण्याच्या विरोधात होते. धर्माने प्रकाश द्यावा, अन्यथा तो निरुपयोगी आहे असे त्यांनी सांगितले. जातिव्यवस्था, अस्पृश्यता व श्रेष्ठतेच्या संकल्पनांना त्यांनी विरोध केला.
किंवा
कित्तूर स्वातंत्र्य संग्रामातील संगोळी रायन्नाचे योगदान सांगा.
कित्तूरसाठी लढणे हे त्यांचे कर्तव्य मानले. राणी चेनम्मासोबत लढले. सैनिक संघटित केले. गुप्त सभा घेतल्या. ब्रिटिशांची कार्यालये व खजिना लुटला. गनिमी कावा वापरला. देशाई लोकांच्या मदतीने ब्रिटिशांनी त्यांना पकडले. रायन्ना यांना नंदगड येथे फाशी दिली.
28. निरक्षरता निर्मूलनासाठी उचललेली पावले लिहा.
शिक्षण अभियान: 2001 – “सर्व शिक्षा अभियान” : 6–14 वयोगटातील मुलांसाठी मोफत शिक्षण. 1988 – “राष्ट्रीय साक्षरता अभियान” सुरू झाले. “साक्षर भारत” कार्यक्रम सुरू. कलम 21A नुसार शिक्षण हा मूलभूत हक्क झाला. 2009 – “शिक्षणाचा अधिकार” कायदा लागू. 6–14 वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण लागू.
29. संघटित व असंघटित कामगारांमधील फरक स्पष्ट करा.
संघटित क्षेत्रातील कामगार: कायदेशीर तरतुदी, सशुल्क रजा, निश्चित काम, रोजगार सुरक्षितता, ठरलेले वेतन, ठरलेला वेळ, कर भरण्याची सक्ती, वैद्यकीय सुविधा. असंघटित क्षेत्रातील कामगार: कायदेशीर तरतुदी नाहीत, रजा नाही, काम निश्चित नाही, वेतन निश्चित नाही, रोजगार सुरक्षितता नाही, कर नाहीत, वैद्यकीय सुविधा नाहीत.
30. काळी माती व लेटेराइट माती यांमध्ये फरक कसा?
काळी माती: आग्नेय खडकांपासून तयार. क्षेत्रफळ 5.46 लाख चौ.कि.मी. कापूस, ज्वारी, कांदा. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर कर्नाटक. लेटेराइट माती: उष्णकटिबंधीय प्रदेशात उच्च तापमान व पावसामुळे तयार. क्षेत्रफळ 2.48 लाख चौ.कि.मी. चहा, कॉफी, रबर. पश्चिम घाट, विंध्य, सातपुडा.
31. वनसंवर्धनाच्या पद्धती कोणत्या?
वनसंवर्धन पद्धती: झाडांचे रोगांपासून संरक्षण, रोपे लावणे, बिया पेरणे, बेकायदेशीर तोड थांबवणे, जनावरांचे चरणे थांबवणे, लोकांमध्ये जनजागृती, सामाजिक वनीकरण.
किंवा
भारतातील महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उद्याने कोणती?
काझीरंगा (आसाम), सुंदरबन (प. बंगाल), हजारीबाग (झारखंड), गिर (गुजरात), कान्हा (म. प्र.), ताडोबा (महाराष्ट्र).
32. पंचवार्षिक योजनांची यशस्वी कामगिरी लिहा.
राष्ट्रीय उत्पन्न व प्रति व्यक्ति उत्पन्न वाढले. अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता मिळाली. रोजगार संधी वाढल्या. विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती झाली. लोकांचे आयुर्मान व साक्षरता दर वाढला. बालमृत्यू व मातामृत्यू दर घटला. जन्मदर-मृत्यूदर कमी झाले.
किंवा
— हरितक्रांतीची प्रेरक घटक कोणते?
डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या प्रयोगामुळे उच्च उत्पादनक्षम गव्हाचे बीज आले. पूर्व व नंतरच्या पिक तंत्रज्ञानाचा वापर, रासायनिक खते व कीटकनाशके, सिंचन सुविधा वाढवणे.
33. बचत खाते व चालू खाते यात फरक कसा?
बचत खाते: नियमित उत्पन्न असलेले व्यक्ती, विद्यार्थी, निवृत्त व्यक्ती खाते उघडू शकतात. ठेवींवर व्याज मिळते. चालू खाते: व्यापारी व व्यावसायिक संस्था खाते उघडतात. व्याज मिळत नाही. सेवांसाठी शुल्क आकारले जाते.
किंवा
बँकेची कार्ये कोणती?
ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, पैसे हस्तांतरित करणे, बिल डिस्काउंटिंग, लॉकर भाड्याने देणे, परकीय चलन व्यवहार.
V. प्रत्येकी आठ वाक्यांमध्ये उत्तर द्या: (4 × 4 = 16)
34. कृष्णराज वडेयर IV यांच्या कामगिरीचे वर्णन करा.
कृष्णराज वोडियार चतुर्थ: प्राथमिक शिक्षण मोफत केले, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन, म्हैसूर विद्यापीठ स्थापन, शिष्यवृत्ती दिल्या, रेल्वे व उद्योग सुरू केले, विधीमंडळ स्थापन केले. महात्मा गांधींनी त्यांना “राजर्षी” म्हटले.
किंवा
— ब्रिटिश महसूल धोरणाचे भारतीयांवरील परिणाम स्पष्ट करा.
नवीन जमीनदार वर्ग तयार झाला, शेतकरी भूमिहीन झाले, जमीन वस्तू बनली, कर्जासाठी जमीन गहाण ठेवावी लागली, शेती व्यापारी झाली, इंग्लंडसाठी कच्चा माल पिकवावा लागला, सावकार सामर्थ्यशाली झाले.
35. अॅनी बेझंट यांच्या सुधारणा कोणत्या?
अॅनी बेझंट : थियोसॉफिकल सोसायटीला नवे जीवन दिले, भारतीय संस्कृतीची स्तुती केली, समता व बंधुता वाढवली, स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा दिला, “न्यू इंडिया” वृत्तपत्र सुरू केले, 1916 मध्ये होमरूल चळवळ सुरू केली, 1917 च्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष झाल्या.
36. ल्यूथर गुलिक यांच्या मते सार्वजनिक प्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करा.
ल्यूथर गुलिक यांच्या मते सार्वजनिक प्रशासनाची व्याप्ती: नियोजन, संघटन, कर्मचारी पुरवठा, मार्गदर्शन, समन्वय साधणे, अहवाल देणे, अर्थसंकल्प मांडणे.
37. बहुउद्देशीय नदी प्रकल्पांची उद्दिष्टे कोणती?
बहुउद्देशीय नदी प्रकल्प: सिंचन, जलविद्युत निर्मिती, पूरनियंत्रण, जलवाहतूक, घरगुती व औद्योगिक पाणीपुरवठा, मृदा संरक्षण, मत्स्य व्यवसाय, वनसंपत्ती वाढवणे.
VI. नकाशावर दाखवा: (5 × 1 = 5)
37. भारताच्या नकाशावर खालीलपैकी कोणतेही पाच दाखवा:
ही उत्तरे नकाशावर दाखवण्यासाठी, तुम्हाला भारताच्या नकाशाची गरज असेल. [भारताच्या नकाशाचे चित्र]





