7th SS Textbook Solution Lesson 1 (7वी समाज विज्ञान पाठ 1 – जगातील प्रमुख घटना)



7वी समाज विज्ञान 

घटक 1 – जगातील प्रमुख घटना 

7th SS Textbook Solution Lesson 1 (7वी समाज विज्ञान पाठ 1 – जगातील प्रमुख घटना)



 

इयत्ता – सातवी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – २०२२ सुधारित 

विषय – स्वाध्याय 

प्रकरण  1 – जगातील प्रमुख घटना 

कालगणना (ख्रि. श. )
धार्मिक युध्दे 12-13 वे शतक
मुलांचे धर्मयुद्ध 1212
प्रेषित महंमद सुमारे 569 ते 632
हिजरी शके –  622 पासून प्रारंभ
चंगेज खान 1162 ते 1227
कुब्लाय खान 1215 ते 1294
तैमूर 1369-1405
चला जाणून घेऊया –
बेथेलहेम – जेरुसलेम जवळ एक लहान शहर आहे.इस्त्रायलमधील ज्यूडिया प्रांतात आहे. येशूंचा जन्म ‘ज्यू’ कुटूंबात झाला.

 अभ्यास

गटांमध्ये चर्चा करून उत्तरे द्या.

1. येशू ख्रिस्तांचा जन्म कोठे झाला ? त्यांच्या आईचे नाव काय आहे? 

उत्तर – येशू ख्रिस्तांचा जन्म बेतल हेम येथे झाला त्यांच्या आईचे नाव मेरी एंबाकेय होते.

2. ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे?

उत्तर – बायबल हा ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ आहे.

3. येशू ख्रिस्तांचे मुख्य उपदेश कोणते ?

उत्तर – पाप करू नये,शुद्ध जीवन जगावे,मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे येशू ख्रिस्ताचे मुख्य उपदेश होते.

4. पोपगुरु कोणाला म्हणतात ?

उत्तर – रोमन कॅथोलिक चर्चेच्या प्रमुखास पोपगुरु असे म्हणतात.

5. धर्मयुद्धांचे मुख्य कारण कोणते होते?

उत्तर – तुर्कांनी पॅलेस्टाईन जिंकून घेतले व ख्रिश्चन यांना पॅलेस्टाईन मध्ये प्रवेश बंद केला हे धर्मयुद्धाचे मुख्य कारण होते.

6. महंमद पैगंबरांचा जन्म कोठे झाला?मुस्लिमांचा धर्मग्रंथ कोणता ?

उत्तर – मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मक्का येथे झाला.मुस्लिमांचा धर्मग्रंथ कुराण होय.

7. प्रेषित महंमदांचे मुख्य उपदेश कोणते ? 

उत्तर – व्यापाऱ्यांनी फसवणूक करू नये.बालहत्या करू नये.डुकराचे मांस खाऊ नये आणि मद्यपान करू नये.श्रीमंतांनी गरिबांना दान करावे.



8.अरबांच्या कोणत्याही दोन योगदानांचा उल्लेख करा.

उत्तर – युनानी ही औषध पद्धत ,भव्य राजवाडा,मशिद,ग्रंथालय आणि रुग्णालय हे अरबांचे योगदान आहे.

9. कुब्लाय खान कोण होता?

उत्तर – कुब्लाय खान हा चीन देशाचा चक्रवर्ती सम्राट होता.

10. अटोमन तुर्कांबद्दल टिपा लिहा.

उत्तर – ऑटोमन तुर्क हे मध्य आशियातील तुर्कस्तानचे होते.ते इस्लाम अनुयायी होते.तुर्कांनी ऑटोमन नावाचे लष्करी राज्य स्थापन केले होते.ऑटोमन तुर्कांनी भारतावर आक्रमण करून अपार संपत्ती लुटली व कित्येक लोकांच्या मृत्यूला आणि दुःखाला कारणीभूत ठरले.





Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *