6 वी समाज विज्ञान
पाठ 3 . मौर्य आणि कुशाण
![]() |
www.smartguruji.in |
1. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली?
उत्तर – चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली.
2. मौर्यांच्या राजधानीचे नाव सांगा.
उत्तर – पाटलीपुत्र ही मौर्यांची राजधानी होती.
3. कौटिल्याने लिहिलेला ग्रंथ कोणता?
उत्तर – कौटील्याने अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला.
4. मेगॅस्थेनिसने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय?
उत्तर – मेगॅस्थेनिसने लिहिलेल्या ग्रंथाचे नाव इंडिका असे होते
5. “सर्व प्रजा माझ्या मुलासारखी आहे” असे म्हणणारा सम्राट कोण?
उत्तर – “सर्व प्रजा माझ्या मुलासारखी आहे” असे सम्राट अशोकाने म्हटले
आहे.
6. धर्ममहामात्र करत असलेली कार्ये कोणती?
उत्तर – जनतेमध्ये चांगल्या वागणुकीचा प्रचार करणे.धार्मिक नितीन नियमांचा प्रचार करणे.अनाथ विधवा आणि वयोवृद्धांची निगा राखणे.ही धर्ममहामात्रांची कार्ये होती.
7. कनिष्काने बौद्ध महासभा कोठे घेतली?
उत्तर – कनिष्काने काश्मीरमध्ये बौद्ध महासभा घेतली.
8. अश्वघोषाची प्रसिद्ध रचना कोणती?
उत्तर – बुद्धचरित्र ही अश्वघोषाची प्रसिद्ध रचना होती.
9. भारताची प्राचीन वैद्यकीय चिकित्सा प्रणाली कोणती?
उत्तर – आयुर्वेद ही भारताची प्राचीन वैद्यकीय चिकित्सा प्रणाली होती.
प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..