प्रजासत्ताक दिन सोहळा : सूत्रसंचालन -7
77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन – सूत्रसंचालन – 7
(सूत्रसंचालक उत्साहाने आणि खणखणीत आवाजात सुरुवात करतील)
सूत्रसंचालक: शुभ प्रभात! सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, आमंत्रित पाहुणे, माझे सहकारी शिक्षकवृंद आणि देशाचे भविष्य असलेल्या माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो.
आज आपण भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. कार्यक्रमाची सुरुवात मी एका सुंदर चारोळीने करू इच्छितो:
पांढरा म्हणजे शांती आणि सत्य
हिरवा म्हणजे समृद्धी आणि आशा
हा तिरंगा आहे आमची परंपरा”
आजच्या दिवशी, आपल्या तिरंग्याकडे पाहून प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण 26 जानेवारी 1950 रोजी खऱ्या अर्थाने आपल्या देशाची लोकशाही जन्माला आली.
सूत्रसंचालक: आता आपण कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे, म्हणजेच ध्वजारोहणाकडे वळणार आहोत. तिरंगा ही आपली शान आहे आणि आपल्या देशाचा मान आहे.
मी आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की, त्यांनी कृपया ध्वजस्तंभाकडे प्रस्थान करावे आणि ध्वजारोहण करावे.
• “परेड… सावधान!”
(सर्व विद्यार्थी ताठ उभे राहतील).
• “ध्वजाला… सलामी द्या!”
(ध्वज फडकल्यावर सर्वांनी सॅल्युट करावा). [109]
• “राष्ट्रगीत… सुरू करा!”
(राष्ट्रगीत संपल्यानंतर)
• “जय हिंद! भारत माता की जय!”
• “परेड… विश्राम!”
राष्ट्रगीत चालू असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रगीताचा मान राखणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.
सूत्रसंचालक: ध्वजारोहणानंतर आता आपण मंचावरील कार्यक्रमाकडे वळूया. आपल्या भारतीय संस्कृतीत पाहुण्यांना देवाचे स्थान दिले जाते. म्हणूनच आपण म्हणतो –
आजच्या या मंगलप्रसंगी मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की, त्यांनी दीप प्रज्वलन आणि प्रतिमेचे पूजन करावे. ज्ञानाची देवता सरस्वती आणि भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण कार्यक्रमातील अंधार दूर करूया.
दीप प्रज्वलनासाठी ही भावना मनात ठेवून आपण म्हणूया:
अंतरातली ही ऊर्जा विरो पूर्ण अंतराळात”
(मान्यवरांचे स्वागत करा: “मी शाळेच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो.”)
(सूत्रसंचालकाने 2 मिनिटांत दिवसाचे महत्त्व सांगावे)
सूत्रसंचालक: मित्रांनो, आजचा दिवस आपण का साजरा करतो? 26 जानेवारी हा दिवस निवडण्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. 1930 साली याच दिवशी ‘पूर्ण स्वराज्या’ची घोषणा करण्यात आली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारीची निवड केली गेली.
आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतील अनेक विद्वानांनी अतोनात कष्ट घेऊन हे संविधान लिहिले.
लोकशाहीचा हा सुंदर देश भारत माझा सर्वश्रेष्ठ”
26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान लागू झाले आणि भारत एक ‘सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक’ राष्ट्र बनले. संविधानाने आपल्याला जगण्याचे, शिक्षणाचे आणि समानतेचे हक्क दिले आहेत, म्हणून आजचा दिवस हा संविधानाचा उत्सव आहे.
सूत्रसंचालक: आजची तरुणाई हीच भारताची खरी शक्ती आहे. उद्याचे भारत घडवणारे हे हात आहेत. आता आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकणार आहोत. त्यांना मंचावर बोलावण्यापूर्वी मला म्हणावेसे वाटते:
स्फुरण चढते या प्रजासत्ताक दिनी”
मी सर्वप्रथम इयत्ता…. मधील विद्यार्थी/विद्यार्थिनी (विद्यार्थ्याचे नाव) याला मंचावर आमंत्रित करतो. त्याने/तिने आपल्या भाषणातून देशभक्तीचे विचार मांडावेत.
(विद्यार्थ्याचे भाषण झाल्यावर) खूप छान! तुझ्या शब्दांतून नक्कीच सर्वांना प्रेरणा मिळाली असेल. टाळ्यांच्या गजरात त्याचे/तिचे कौतुक करूया.
यानंतर मी (पुढच्या विद्यार्थ्याचे नाव) याला मंचावर बोलावतो.
जो अपने दम पे जिये, सच में जिंदगी है वही!”
सूत्रसंचालक: कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत. आजचा सोहळा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केली, त्यांचे आभार मानणे हे माझे कर्तव्य आहे.
आभार मानताना मला इतकेच म्हणावेसे वाटते:
हृदयामध्ये घर असावे, त्या हृदयाला दार कशाला”
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, शिक्षक आणि शिस्तप्रिय विद्यार्थी, आपणा सर्वांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार! आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक बनून देशाची प्रगती करूया, हीच आजच्या दिवसाची खरी शपथ आहे.
जाता जाता आपण सर्वांनी माझ्यासोबत मोठ्या आवाजात घोषणा द्यायची आहे:
(यानंतर सर्वांना मिठाई वाटप करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर करावे).


