शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करेल तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात बाबासाहेब आंबेडकर यांनी
शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे.खडतर जीवन जगत असताना त्यातून बाहेर पडून समृद्ध जीवन जगायचे असेल, आपले विचार समृद्ध करायचे असतील,आपल्यात अमुलाग्र सकारात्मक बदल घडवण्यासाठी शिक्षण हे प्रभावी अस्त्र म्हणून शिक्षणाकडे पाहण्याचा उपदेश डॉ. बाबासाहेबांनी दिला.
शिक्षण माणसाला कर्तव्य आणि हक्कांची जाणीव करून देते व्यक्ती बुद्धीने सशक्त होतो चांगले व वाईट यातील फरक कळतो शिक्षणाचे इतरांप्रति आदर, विनयभाव,क्षमाभाव हे गुण येतात.शाळेत बाराखडी शिकवून उपयोग नाही त्यासोबत मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय झाली पाहिजेत.शाळा हे उत्तम कर्तव्यदक्ष नागरिक बनवणारे याचे भान शिक्षकांनी ठेवावे.राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारे हेच खरे शिक्षण असे बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते.
जय
हिंद – जय भारत
आशिष अनिल देशपांडे (सर)
राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शक
कॉल व व्हॉट्सअॅप – 9021481795
वरील भाषणाची pdf डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर स्पर्श करा..