लेक वाचवा ! देश घडवा !!

लेक वाचवा  ! देश घडवा !!
आपल्या देशात मुलींची संख्या मुलांच्यातुलनेत दिवसेन दिवस घटताना दिसत आहे. हे असे लिहण्याला अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि वैचारिक गोष्टी कारणीभूत आहेत. आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचा मोलाचा वाटा आहे.पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपलादेश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्या तुलनेतील संख्या कशी वाढेल याकडे गांर्भियाने लक्ष द्यायला हवे. आपल्या देशातस्त्री-पुरूष समानतेचा फक्त गाजावाजा होतोय पण ती समानता प्रत्यक्षात आलेली कोठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळेच देशातील स्त्रियांची संख्या पुरूषांच्या तुलनेतकमी होत चाललेली आहे. बालमृत्यू होण्याच्या घटनेतही मुलींच बालमृत्यू होण्याचप्रमाण अधिक आहे.
    आजही समाजात मुलींच्या संगोपनात हलगर्जीपणा केला जातो हे सत्य नाकारता येणार नाही इतकच नव्हे तर समाजातील काही घटकात मुलीला जन्म देणाऱ्या आईचीही उपासमार होताना दिसते. आज ही आपल्या देशातील बऱ्याच भागातील स्त्रिया सुशिक्षीत सुसंस्कृत असतानाही पुरूषांच्या हातातील खेळणे झाले असल्याचे दिसतात.त्यांच्या विचारांना तेथे काडीची ही किंमत नसते हे चित्र फारच विदारक आहे. आपल्या देशातील स्त्रियांची पुरूषांच्या तुलनेत घटती संख्या हा विषय अथवा समस्या काही महिन्याच्या अंतराने ऐरणीवर येत असते. पण सरकारने त्यावर काही ठोस उपाय योजल्याचे जाणवत नाही. आपल्या देशातील या संबंधीत यंत्रणा कुचकामी ठरल्यात असंच म्हणावं लागेल. मुलाच्या हव्यासा पोटी काही लोक चार-पाच मुलींना जन्माला घालतात पण नंतरत्या त्यांच्यासाठी ओझ ठरतात त्यामुळे ते त्यांच्या तब्बेतीकडे खाण्यापिण्याकडेदुर्लक्ष करतात. परिणाम स्वरूप कळ्या फुलण्या अगोदर कोमेजून नष्ट होतात. आतायापुढे देशात जन्माला येणार्या प्रत्येक मुलीची काळजी सरकारने घ्यायला हवी. बदलत चाललेली सामाजिक परिस्थिती ही अगदी सुशिक्षित उच्च शिक्षित लोकांनाही मुलगी नको याविचारापर्यत पोहचायला प्रवृत्त करते.


                    आपल्या देशात धर्म आणि संस्कृतीचा चुकीचा अर्थ काही अज्ञानी लोक लावत असतात त्यामुळे ही मुलींची संख्या घटताना दिसते. मुलगा हवा या हट्टापायी जर काही लोक चार-पाच मुलींना जन्म देत असतील तर ते देशाच्या हिताचेच आहे.त्यामुळे जन्माला येणाऱ्या सर्वच मुलींची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. हे झाले मध्यमवर्गीय माणसांच्या बाबतीत पण श्रीमंत वार्गाला एकच आपत्य हवेअसते ते आपत्य ही मुलगा असावा अशी काहींची इच्छा असते. यातूनच त्यांच्याकडून मुलींचा गर्भात असतानाच जीव घेण्याचे प्रकार घडतात. मुलगा आपली म्हातारपणी काळजी घेईल या खोट्या आशेवर जगत असणारे मुलाचा अट्ट्हास करीत असतात. सर्वच जेष्ट नागरिकांची काळजी जर सरकारणे उचलायची ठरवली तर यात बदल करता येईल. देशातील मुलींचीमुलांच्या तुलनेत घटती संख्या वाढेल पण त्यासाठी मुलींच्या जन्माला अवरोध करणार्याप्रत्येक घटकांचा मुलापासून सर्वनाश करावा लागेल. मुलगी वाचली तरच देश घडेल. हे करण्यासाठी देशातील सरकारसह या संबंधित सर्वच यंत्रणांनी कसून प्रयत्न करायला हवेत.

        – मराठी निबंध अँँप

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now