सातावी – इतिहास
1. विजयनगरचे साम्राज्य
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) विजय नगर साम्राज्याची स्थापना कोण कोणत्या राजांनी केले?
उत्तर – 1336 मध्ये संगम चे पुत्र हरिहर ,बुकराय ,कंपन ,माराप्पा ,आणि मुद्दापा यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केली.
2)विजय नगर साम्राज्याची राजधानी कोणती?
उत्तर – हम्पी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती.
3)विजय नगर साम्राज्यावर कोण कोणत्या राज्य घराण्यांनी राज्य केले?
उत्तर –विजय नगर साम्राज्यावर संगम वंश, साळूव वंश, हाल माडी ,वंश तुळुव वश , या चार घराण्याने राज्य केले.
4)विजयनगर साम्राज्यातील प्रसिद्ध राजा कोण?
उत्तर – कृष्णदेवराय हा विजय नगर साम्राज्यातील प्रसिद्ध राजा होता.
5) रकस तंगडी युद्ध कोणामध्ये झाले ?
उत्तर – रकस तंगडी युद्ध विजयनगरचे सैनिक व दख्खनचे सुलतान यांच्यामध्ये झाले.
6)विजयनगर साम्राज्यातील राज्याच्या उत्पन्नाची साधने कोणते?
उत्तर –वाणिज्य कर ,व्यापारी कर ,रस्ते कर ,बाजार कर ,निर्यात कर, बिदागी ,देणग्या ,इत्यादी राज्याच्या उत्पन्नाची साधने होत.
7,) विजयनगर साम्राज्यात कोण कोणते सण साजरे करत होते?
उत्तर –विजयनगर साम्राज्यात दिवाळी-दसरा इत्यादी सण साजरे करतात.
8) विजयनगर साम्राज्याला भेट दिलेले विदेशी प्रवासी कोण ?
उत्तर – अब्दुल रजाक,दोमिंगो पायस ,बाब्रोसन हे विजयनगर साम्राज्याला भेट दिलेले प्रवासी होत.
9)विजयनगर साम्राज्यातील प्रमुख शिल्पकला कोणत्या?
उत्तर – हंपीचे विरूपाक्ष देवालय ,कल्याण मंडप , हजार राम स्वामी देवालय , विठ्ठल स्वामी देवालय, कृष्ण स्वामी देवालय ,कमल महाल, हम्पी मधील दगडी रथ इत्यादी ह्या विजयनगर साम्राज्यातील प्रसिद्ध शिल्पकला.
रिकाम्या जागा भरा
1) विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी होय.
2 विजयनगर साम्राज्याचे राजचिन्ह वराह आहे.
3) संगम वंशातील हरिहर हा पहिला राजा.
4) राणी गंगादेवी हिने मधुरा विजयम संस्कृत साहित्य लिहिले.
5) संगम वंशातील प्रसिद्ध राजा प्रौढ देवराय होय.
6) विजयनगर साम्राज्यातील प्रसिद्ध राजा कृष्णदेवराय होय.
7) रकस तंगडी युद्ध 23 जानेवारी 1565 मध्ये झाले.
8) कृष्णदेवराय यांना आंध्र भोज ही पदवी मिळाली.
9) कृष्णदेवराय यांनी अमुक्तमाल्यादा साहित्य लिहिले.
10) कृष्ण देवराय याने प्रतिष्ठापनचार्य ही पदवी धारण केले
11) रकस तंगडी युद्धात रामरायाचा वध झाला.
(12) विजय नगरातील वस्तू शिल्पकला ह्या द्रविड शैलीतील होत्या





